नाशिकमध्ये येणार 3 तरुण भारत !!!

नाशिकमधील संघ परिवार, भारतीय जनता पार्टीचे वाचक फारच नशिबवान ठरणार आहेत. संघ आणि त्यांचा राष्ट्रीय विचाराचा गवगवा करण्यासाठी संघाचे मुखपत्र मानलेल्या "तरुण भारत" च्या 3 आवृत्ती नाशिककरांना मिळणार आहे. सध्या मुंबईतील करंबळेकर यांच्या "मुंबई" तरुण भारतचा नाशिक तरुण भारत नाशिकमध्ये येतोय. हा अंक शहरात रुजला असून नाशिककरांचे मुंबईशी व्यावहारिक व भावनिक नाते आहे.
दुसरीकडे जळगावच्या माधव प्रतिष्ठानच्या "जळगाव" तरुण भारतने नाशिक तरुण भारत सुरु करायला चाचपणी केली आहे. याच्याशी संबंधित चोपडा व जैन नाशिकला येवून गेले. त्यांनी मुंबई तरुण भारतच्या ओसवालांना हाताशी धरून माणसे गोळा करणे सुरु केले आहे. जळगाव तरुण भारत धुळे व नंदुरबार येथे आजही कार्यालय करु शकलेले नाही. मात्र, चोपडा, जैन व ओसवाल यांची नाशिक तरुण भारतची घाई नाशिककरांना बुचकाळ्यात टाकणारी आहे.
तिसरा तरुण भारत हा "बेळगाव" तरुण भारतचे सर्वेसर्वा किरण ठाकूर यांचा येत असल्याची चर्चा आहे. ठाकूर यांनी चाचपणी सुरु केली असून त्यांच्या तरुण भारतचे वर्चस्व कोल्हापूर परिसरात आहे. ठाकूर यांच्या तरुण भारतचा गृप आणि नागपूरचे तरुण भारत असोशिएट स्वतंत्र आहे. मात्र, व्यायसायिकदृष्ट्या ठाकूर हे आक्रमक मानले जातात. तंत्र व यंत्राबाबत बेळगाव तरुण भारत सशक्त आहे.

कर्मचाऱ्यांना होणार लाभ
नाशिकमध्ये तरुण भारतच्या या तिहेरी लढाईत पत्रकार, अॉपरेटर, जाहिरात व वितरण प्रतिनिधिंना भरघोस वेतनाचा लाभ घेता येईल. किंबहुना तो तसा घ्यावा. नाहीतर शिपाई व अॉपरेटरपेक्षा वार्ताहर व उपसंपादकाला कमी वेतन देण्याचे प्रकार आता काही व्यवस्थापन करीत आहेत. तरुण भारत मध्ये नोकरीला जाताना एक विचार प्रत्येकाला करावा लागेल. हा पेपर किती दिवस चालणार ? केवळ हजार, बाराशे अंकाचा हिशोब करून कार्यालयाचे गणित मांडणारी व्यवस्थापन मंडळी कधीही आवृत्ती गुंडाळू शकते हे संभाव्य सत्य नोकरी करण्यापूर्वी समजून घ्यावे लागेल. तरुण भारत असोशिएटमध्ये औरंगाबाद, सोलापूर, मुंबई यांचे आपापसात वाद विवादाचे विषय आहे. अंकाचा खप नसतानाही ही मंडळी नफ्याच्याच भागिदारीमुळे गळ्यात गळा घालून आहे.