डोंग्रजकर यांंचीही नकारघंटा !

औरंगाबाद- नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने,अशी मराठीत एक म्हण आहे.त्याचाच प्रत्यय पुढारीला वारंवार येत आहे.सुशिल कुलकणी यांनी  एक दिवस जॉईन होवून नंतर जसा नकार दिला,तसाच कित्ता आता मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांनी गिरवला आहेे.डोंग्रजकर यांनीही पुढारी जॉईन करण्यास नकार दिल्याचे समजते.
पुढारीसाठी कार्यकारी संपादक म्हणून सुशिल कुलकर्णी यांची निवड करताच निवासी संंपादक भालचंद्र पिंपळवाडकर यांनी पुढारीला सोडचिठ्ठी देवून पुण्यनगरी जॉईन केले,परंतु सुशिल कुलकर्णी यांनी पुढारी जॉईन न केल्याने सुंदर लटपटे यांंनी पुण्यनगरी सोडून पुढारी जॉईन केले.त्यानंतर निवासी संपादक म्हणून एकमतचे संपादक मंगेश देशपांडे - डोंग्रजकर यांनी निवड झाली,त्यांनी पुढारी कार्यालयात काही दिवसांपुर्वी समुह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांच्या हस्ते पुष्पहारही स्वीकारला,परंतु ते नंतर प्रत्यक्षात जॉईनच झाले नाहीत.शेवटची तारीख 10 ऑक्टोबर होेती,त्या दिवशीही ते जॉईन न झाल्यानेे आता डोंग्रजकर पुढारीत येणार नाहीत,हे स्पष्ट झाले आहेे.
याबाबत बेरक्या सुत्राने मंगेश डोंग्रजकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,मी पुढारीत जॉईनच झालो नव्हतो,फक्त बोलणी झाली होती,मी एकमतमध्ये आर्थिक व्यवहार पहात असल्याने येथील व्यवहार मिटल्यानंतर पुढचा निर्णय घेणार आहेे.सुशिल कुलकर्णी यांच्याकडे कोणते पद राहील,काय जबाबदारी राहील,हे अमित देशमुख साहेब ठरवतील,तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही....
डोंग्रजकर यांच्या म्हणण्यानुसार ते पुढारीत जॉईन होतील,याची शक्यता फार कमी आहे.डोेंग्रजकर यांनीही सुशिल कुलकर्णी यांचा कित्ता गिरवल्यामुळे पुढारीला मोठा झटका बसला आहे.
पुढारी औरंगाबादेत केव्हा सुरू होणार हे सांगणे अवघड आहे.कारण ग्रामीण भागात अजून टीम नाही.प्रिटींग मशिन अजूनही नीट काम करत नाही,डमी अंक सुरू असला तरी त्यात अनेक अडचणी आहेत.मालक पद्मश्रींना दीपावलीपुर्वी अंक सुरू करण्याची इच्छा आहे,परंतु समुह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांच्या एकछत्री आणि मनमानी कारभारामुळे पुढारीचा वारंवार फियास्को होत आहे.ते स्थानिक कार्यकारी संपादकावर सुत्रे सोपावयाला तयार नाहीत,सर्व कारभार कोेल्हापूरातून हाकत आहेत,मालकाचा पवारावर विश्‍वास आहे,परंतु उंटवरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.
जोेपर्यंत मालक स्थानिक कार्यकारी संपादकास सर्व अधिकार देणार नाहीत,तोपर्यंत पुढारीची गाडी रूळावर येणार नाही,हे मात्र नक्की...
पद्श्रींंना कोणी तरी सांगा रे....त्या सुरेश पवार यांच्यावर नका इतका विश्‍वास ठेवू.....
दोन वेळा तोंडघशी पडले.....एकदा सुशिल कुलकर्णी यांंच्यावेळी आणि आता मंगेश डोंग्रजकर यांच्या वेळी....
नविन माणसे यायला तयार नाहीत आणि जुने टिकायला तयार नाहीत...
पुढारीचा चांगभले !