आशिष जाधव यांची महाराष्ट्र १ ला सोडचिठ्ठी

मुंबई - प्रदीर्घ रजेनंतर आशिष जाधव यांनी महाराष्ट्र १ च्या  संपादक पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र १ चे पाय आणखी खोलात गेले आहेत.
निखिल वागळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आशिष जाधव यांना कार्यकारी संपादक करण्यात आले होते. मात्र एक वर्षाच्या आतच जाधव यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र १ मधून सर्व शिलेदार बाहेर पडल्यानंतर आशिष जाधव यांनी एक हाती तंबू उभा केला होता. पण तीन पार्टनरच्या मनमानीला कंटाळून जाधव यांनीही   राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र १  ची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. गेल्या अनेक महिन्यापासुन कर्मचाऱ्यांच्या पगारी नाहीत, या चॅनलने फिअरलेस मीडिया कंपनी दिवाळखोरीत काढून जुन्या ११६ कर्मचाऱ्याचा जवळपास ६ महिन्याच्या पगार बुडविला आहे, त्यातील काही कर्मचाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. हे चॅनल अनेक DTH आणि केबल वरून गायब झाले असून  शेवटची घटका मोजत आहे.

संबंधित बातमी