मध्य प्रदेशात ट्रकखाली चिरडून पत्रकाराची हत्या

भोपाळ : एका पत्रकाराची ट्रकखाली चिरडून हत्या घडवून आणण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भिंड येथे घडली आहे. वाळूमाफिया आणि पोलीस अधिकाऱ्याचे स्टिंग ऑपरेशन केल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

संदीप शर्मा 'न्यूज वर्ल्ड चॅनेल' या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशातील भिंड शहरात झालेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

वाळूमाफिया आणि पोलीस अधिकाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन केल्याच्या रागातून संदीप शर्मांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे.

दुचाकीस्वार संदीप शर्मा यांना ट्रकने धडक देऊन चिरडलं. अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संदीप चव्हाण यांनी पोलिस सुरक्षेची मागणीही केली होती. बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांसोबत पोलिसांचं साटंलोटं असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन दिले आहे.