'वरखडे' यांना पुण्यनगरीतून 'भागा'चा आदेश !

पुणे - पुण्यात पुण्यनगरीचा खप दिवसेंदिवस घसरत चाललाय, त्यामुळे वैतागलेल्या बाबांनी काल निवासी संपादक भागा  वरखडे  आणि सहसंपादक सुनील देशपांडे यांचा राजीनामा घेतलाय. त्यांचे राजीनामे 'एप्रिल फुल' ठरणार की खरोखरच घरी पाठवणार हे लवकरच कळेल, मात्र दुसरीकडे संपादकीय वृत्तविभाग प्रमुख म्हणून श्रीकांत साबळे यांना नेमणूकपत्र देण्यात आले असून साबळे २ मे रोजी पुण्यनगरीत जॉईन होणार असल्याचे कळते.
पुण्यनगरीची सुरुवात पुण्यापासून झाली आणि बघता बघता संबंध महाराष्ट्रात पुण्यनगरीच्या आवृत्या सुरु झाल्या, मात्र जेथून सुरुवात झाली तेथेच पुण्यनगरीला उतरती कळा सुरु झाली आहे. खप ७० हजारहून १७ हजारावर आला आहे. त्यात पुण्यनगरीतील अंतर्गत राजकारण खपाला  मारक ठरत आहे.
नगरच्या कोपरगावमध्ये उदय भविष्यपत्रात 'भविष्य'  न घडल्यामुळे भागा  वरखडे   पुण्यात पुण्यनगरीत आले होते, मागे त्याना एका xx प्रकरणावरून पिंपरी चिंचवड मध्ये पाठवण्यात आले होते पण गोपाळ जोशी यांची विकेट पडताच त्यांना पुन्हा पुण्यात घेण्यात आले पण येथील राजकारणाचा वरखडे पुन्हा बळी पडले असून त्यांना पुन्हा नगरला 'भागा' म्हणून सांगण्यात आले आहे. बाबाचा स्वभाव लहरी आहे, त्यामुळे भागाला बाबा कायमचे जा म्हणतात की एप्रिल फुल होते म्हणून सांगतात हे लवकरच कळेल...
दुसरीकडे संपादकीय वृत्तविभाग प्रमुख म्हणून सोलापूरच्या पुढारीचे ब्युरो श्रीकांत साबळे यांना नेमणूकपत्र देण्यात आले आहे, साबळे यांनी पुढारीला रामराम ठोकला असून ते २ मे रोजी पुण्यनगरीत  जॉईन होणार आहेत. साबळे येताच सुनील देशपांडे किंवा भागा वरखडे यांना कायमचा घरचा रस्ता धरावा  लागेल,  हे मात्र नक्की आहे..
जाता जाता
पुण्य नगरीच्या मुख्य संपादक पदासाठी मानबिंदूच्या  एका 'राजा'चे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे मॅडम सलाईनवर आहेत. राजा आल्यास अनेक 'प्रधान' घरी जाण्याची  शक्यता आहे...