पुण्याच्या पुण्यनगरीत नेमकं काय घडतंय ?

पुण्यनगरीच्या पुणे आवृत्तीचा खप घसरलाय, त्याचे खापर संपादकीय विभागावर फोडलं जातंय ..  गेली पाच वर्ष वार्ताहर म्हणून काम केलेल्या एका महिला पत्रकारासह पाच जणांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलंय... याबद्दल ती महिला बेरक्यास लिहितेय ...

मी.....

दैनिक पुण्यनगरी पुणे कार्यालयात गेली 5 वर्षे वार्ताहर म्हणून काम करत आहे. इतर दैनिकांच्या कार्यालयात छोट्या मोठ्या राजकारणा प्रमाणे इथेही काही अंतर्गत वाद होते. तरीही ऑफिसमध्ये सर्वजण मिळून मिसळून काम करायचे. मात्र गेल्या 2 वर्षात पुणे कार्यालयात फारच भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.  ऑफिसमधील अंतर्गत राजकारणामुळे काम करत नाही हे कारण देत, माझ्यासह 5 जणांचा राजीनामा मागितला आहे. 
पुणे ऑफिसमध्ये संपादक म्हणून गोपाळ जोशी जेव्हा पासून जॉईन झाले होते, तेव्हापासून वादविवादला सुरुवात झाली. वरिष्ठ वृत्तसंपादक सुनील देशपांडे यांनी संपादक पदावर नजर होती. मात्र त्यांना डावलून निवासी संपादक भागा वरखडे यांनी पुण्यनगरी समूहाचे वरिष्ठ सल्लागार बोराडे, (जे त्याचे चांगले मित्र आहेत) यांना हाताशी धरून मित्र जोशी यांना खुर्चीवर बसवलं.याच डूख मनात धरून देशपांडे यांनी जोशी विरोधात राजकारण सुरू केलं. या सर्वांचा परिणाम दैनिकांच्या खपावर होऊ लागला.
दैनिकाचे मालक मुरलीधर शिंगोटे (बाबा) गेली 3 महिने ऑफिसमध्ये तळ ठोकून आहेत. अंकाचा खप कमी झाल्यामुळे ते सर्वांवर नजर ठेवून आहेत. बाबा इथे असल्याचा गैरफायदा घेत एकमेकांविरोधात बाबांचे कान भरले जात आहेत.देशपांडे यांनी indirectly 4 ते 5 वेळा ऑफिस सोडून जाण्याच्या सूचना बाबांनी दिल्या असतानाही देशपांडे अजून ही ऑफिस ला येतात. अंक वाढीसाठी संपादकीय विभागाचा काडीचा अनुभव नसलेल्या तानाजी पाटील म्हणून नव्या माणसाला 2 महिन्यांपूर्वी आयात केलं आहे. त्याने नवीन कारवाया सुरू केल्या आहेत. जबरदस्तीने १५ फेबला माझी बदली पिंपरी-चिंचवड ऑफिसला केली आहे. नोकरी सोडावी लागेल किंवा पिंपरी ऑफिसला जा अशी धमकी बाबांकरवी मला देण्यात आली. मला तिकडची काहीच माहिती नसताना संपूर्ण शहरातील उपनगराच्या बातम्या करण्याची जवाबदारी दिली आहे.  उपनगर बातमीदारी काय असते, हे या पाटलाला माहिती नाही, तो एकाच वेळी हिंजवडी ते भोसरीतील सर्व बातम्या द्यायला सांगतो. यात माझी एक महिला पत्रकार म्हणून खूप मोठी कुचंबणा होत असून या बद्दल कोणीच ऐकायला तयार नाही. गेल्या 15 तारखेपासून काहीच काम केलं नाही या मुद्द्यावर बोराडेने मला राजीनामा मागितला आहे. 
पिंपरी ऑफिसला गेल्यापासून स्पोर्ट आणि इतर जनरल बातम्या करण्यासाठी तिकडचा सर्व स्टाफ मला मदत करतो, मात्र पुणे ऑफिस मधून अद्याप वरिष्ठ पातळीवरून राजकारण सुरू आहे. अंकाचा खप वाढवा नाहीतर राजीनामा द्या, असे बाबांनी सर्व वरिष्ठांना खडसावले होते. आपली नोकरी वाचवण्याच्या नादात देशपांड्यांनी अंक वाढीची जवाबदारी घेतली. यावरून बाबांनी देशपांडे आणि वरखडे यांना स्टँप पेपर वर सह्या करायला सांगितल्या. मात्र या दोघांनी स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी अगदी सफाई कामगार पासून सर्वांच्या सह्या घ्येण्याचा सल्ला दिला अन बाबांनी सह्या घेतल्यापण, अंक वाढीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन मात्र तस झाली नाहीतर तुम्ही मला कामावरून कधीही काढू शकता, तुम्हाला तसे अधिकार आहेत. आशा मायण्यावर सर्वांच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या आहेत. यामध्ये सर्व वार्ताहरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  बोराडेने या गोष्टीचा गैरफायदा घेतला असून त्याने माझ्यासह 5 जणांना राजीनामा मागितला आहे. माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणीच मदत करत नाही. मला कधीही कामावरून काढू शकतात. माझ्यावर सासर आणि माहेर अशा दोहोंची जवाबदारी आहे. सध्या मीडियात कुठेही जॉब नसल्याने माझ्यासह इतरांपुढे नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक महिला पत्रकार