जय महाराष्ट्र मध्ये पुन्हा खोगीर भरती !

टीआरपीच्या नावाने बोंबाबोंब !
मुंबई - एकेकाळी मुंबईत डान्स बार चालवणाऱ्या सुधाकर शेट्टी यांनी, डान्स बार बंद झाल्यानंतर न्यूज चॅनल काढले खरे, पण अनेक कोटी पाण्यात घालूनही हे चॅनल टीआरपीमध्ये चारच्या पुढे सरकत नाही.

या चॅनलच्या मालकाला सतत संपादक बदलण्याची सवय आहे. म्हणजे मालकाला एकाच्या डोक्यावर दुसरा ठेवण्याची सवय आहे.चॅनल सूरु झाल्यानंतर मंदार फणसे, रवींद्र आंबेकर, तुळशीदास भोईटे हे त्रिकुट आले , ते गेल्यानंतर समीरण वाळवेकर , निलेश खरे, प्रसन्न जोशी हे त्रिकुट झाले , आता आशुतोष पाटील, आशिष जाधव आणि मनोज भोयर हे त्रिकुट आले आहे. त्यात तुषार शेटे, विनोद राऊत आहेत. स्टारकास्ट घेऊन एखादा चित्रपट काढावा आणि तो फ्लॉप ठरावा तसे या चॅनेलचे आहे. 
आपल्यापेक्षा कोणी वरचढ होऊ नये, म्हणून येथे कुरघोडी केली जाते, त्यात चॅनेलची माती होत आहे.

गचाळ वितरण, कोणती बातमी कोणत्या वेळी चालवावी याचे न्यूज सेन्स नाही, व्हाईस ओव्हर खराब, स्क्रिप्ट रायटिंग बंडल यामुळे हे चॅनल सहसा कोणी बघत नाही. त्यामुळे टीआरपी काही वाढत नाही. कोणाचा कोणावर विश्वास नसल्यामुळे येथे फक्त पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे.

आता निवडणूका जवळ येत असल्यामुळे खोगीर भरती सुरू आहे, निवडणूक पार पडताच पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असेच होणार, हे नक्की. त्यामुळे कोणी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहू नये....