एबीपी माझाचे पुन्हा लोटांगण ...

नाशिक - एका तहसिलदारांच्या बदनामीकारक बातमी प्रकरणी 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझा चॅनलला जाहीर माफी मागावी लागली आहे. गेल्या १५ दिवसात एबीपी माझाला दुसऱ्यांदा जाहीर माफी मागावी लागली आहे.

तहसीलदार प्रशांत सुभाष बेडसे   सध्या चंद्रपूर येथे कार्यरत आहेत. सागर वैद्य या पत्रकाराने 2 वर्षापूर्वी त्यांची  बदनामी करणारी बातमी तयार करून  दबाव टाकण्याचा व ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी बेडसे  यांनी सागर वैद्य  विरुद्ध खंडणीचा  गुन्हा दाखल केला तर एबीपी माझा विरुद्ध कोर्टात अब्रू नुकसानीची केस दाखल केली होती. त्यामुळे एबीपी माझाने ऑन  एयर जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला आहे.

सावरकर प्रकरणी  एबीपी माझाने जाहीर माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा एबीपी माझा तोंडावर पडले आहे.