नव्या भारतात बेवड्यांचा तमाशा !

 गांधीवादी विचारांच्या नव्या राष्ट्रातील उज्ज्वल परंपरेच्या संस्थेची HR, मार्केटिंग, जाहिरात, ॲडमिन, व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी लाज घालविली !


स्वतःला गायक कुमार सानू समजणारा बंगाली मार्केटिंगवाला जमिनीवर डुकरागत लोळत पडला होता.
          स्वतःला गायक कुमार सानू समजणारा बंगाली मार्केटिंगवाला जमिनीवर डुकरागत लोळत पडला होता.


मुंबई - नव्या भारतातली, मध्य प्रांतातील, नव्या राष्ट्रातील एका प्रमुख राष्ट्रीय दैनिक पत्राच्या HR, मार्केटिंग, जाहिरात, ॲडमिन, व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री मुंबईतील एका पत्रकारांच्या क्लबमध्ये मद्यधुंद तमाशा केला. या वर्तनभ्रष्ट अधिकाऱ्यांनी गांधीवादी परंपरेच्या संस्थेची अक्षारश: लाज घालविली. ऊर फाटेस्तोवर फुकटची दारू हपापल्यागत ढोसल्यावर ती अनेकांच्या पार गळ्यापर्यंत आली. मग काय, काही झोपडपट्टीस्टाईल ओक-ओक ओकले, काही डुकरागत जमिनीवर लोळले. 


स्वतःला "राजे" समजणाऱ्या मात्र "विशाल" अशी भानगडबाज प्रवृत्ती असणाऱ्या पत्रकारांनीच ही बारी आयोजित केली होती, असे सांगितले जात आहे. या सर्व मंडळींना आपल्या संस्थेच्या इभ्रत आणि प्रतिष्ठेचा विचारसुद्धा शिवला नाही. एकालाही "राम-गोपाल"सारखी कोणतीही दैवते आठवली नाहीत. काही अतीवरिष्ठ अधिकारी तर मजेत बाजूला बसून सारा लाईव्ह शो पुरेपूर एन्जॉय करत होते. वेळीच हस्तक्षेप करून आपल्या सहकाऱ्यांना आवरावे, संस्थेची इज्जत जपावी, या जबाबदारीचे भानही त्यांना राहिले नाही. पिऊन लोळणाऱ्या डुकरांपेक्षा हे नामानिराळे राहिलेले, बेजबाबदार, बघे अतीवरिष्ठ अधिकारी या सर्व प्रकारासाठी Adcountable ठरतात. नुसता नावात श्री आणि मनात सैतानाचा निवास असले ठोंबे गुळाचे गणपती संस्थेच्या हितासाठी काहीच करणार नसतील, तर मग उपयोग काय त्यांचा?  

असेही काही शहर मध्ये नालायक संपादक आहेत, जे व्यवस्थापनाची हुजरेगिरी, लंपटगिरी, लोचटगिरी अन् चाटुगिरी करून संस्थेला "मामा" बनवत आहेत. पत्रकारांच्या सभ्य, सुशिक्षित व मर्यादा असलेल्या क्लबात झोपडपट्टी क्लासच्या दारूपार्ट्या आयोजित करून घाण करणारे हे नालायक खरेच पत्रकार म्हणाविण्याच्या लायकीचे आहेत काय?


गांधीवादी विचारांच्या दैनिकातील ही संपादकीय वगळता इतर विभागांची अधिकारी मंडळी आणि त्यांची हुजरेगिरी करणारे दोन पत्रकार या मंडळींनी पत्रकारांच्या क्लबमध्ये दारू पिऊन झोपडपट्टीस्टाईल तमाशा केला अगदी. या लोकांना धक्के मारून बाहेर काढण्याची वेळ आली. काही जण तर क्लबमध्ये दारू पिऊन तर्र होऊन डुकरागत लोळत होते. त्यात वरिष्ठ अन् जबाबदार पदावरील अधिकारीही होते. हे काही अधिकारी मिळून सिंडिकेंटचे खास असलेल्या मंत्रालयीन दलाल पत्रकाराच्या मदतीने गेले अनेक दिवस जोरात दुकानदारी चालवत आहेत. ही सर्व नालायक मंडळी आहेत. माणूस कर्माने अन् वर्तणुकीचे श्रेष्ठ असावा लागतो.


झोपडपट्टीतले गावठी आणि देशी दारू पिणारे बरे यांच्यापेक्षा, अशी स्थिती काल होती. अहंकार, उन्मंतपणा यातून काहींची "तापस" लेल्या वृत्तीने "बासू" गिरी सुरू होती. स्वतःला कुमार सानू समजून गाणे म्हणत संस्थेचे सोडून स्वतःचे "मार्केटिंग" करत फिरणाऱ्या या महाभागांनी कधी इतरांच्या सोडून स्वतःच्याच बातम्या घुसवू पाहिल्या होत्या  मग मालकाने नागपुरी सावजी धुरी दिल्यानंतर हे गायक शांत बसले होते. मात्र, हा माणूस भयंकर स्त्री-लंपट, बायको दिसली की याची लाळ टपकलीच. कालही काही-काही आचार-उच्चार भान उरलेले नव्हते महोदयांना. याशिवाय सोबत असलेल्यांनाही  संस्थेच्या इभ्रतीचा काही विचार केला नाही. वितरणात काटे फुलविणारा "गुलाब" ही या "यादवी त सामील होता.


अली कडे नव्या भारतात अशा जाहिल प्रवृत्ती उदंडपणे बोकाळत चाललेल्या आहेत. आश्चर्य म्हणजे, काही इतर ठिकाणी संपादक असलेले तर नव्या राष्ट्रात येऊन वेगळीच दुकानदारी करत आहेत. अर्थातच या "साठा" उत्तराच्या कहाणीतील काही प्रसाद अन् मेजवानी ही "श्रीं"च्या चरणी नियमित अर्पण केली जात आहे. त्यामुळे नुसता नावात "अजित" असून काही "डोवालां"चा रुबाब येत नाही. तर आवाजाचे संचालन करायला (व्हॉईस डायरेक्शन) जमले पाहिजे. स्वतच्या वर्तनातून तसा आदर्श उभा करून नैतिक जरब निर्माण करावी लागते. आपल्या डोळ्यादेखत चालत असलेले सिंडिकेट धंदे बंद करण्याची, संस्थेच्या हितात काम करून, संस्थेची फसवणूक टाळण्याची हिंमत दाखवायला लागते. 


ही मंडळी कार्यालयातच सिंडिकेट करून धंदे करतात. एखाद्या क्लबपेक्षा वेगळे नाही ते. यातील काही माजोरडे आजच्या जगातही मनुवृत्तीने वागून जातीचे "भूषण" सांगतात. कर्मचाऱ्यांना जातीवरून कमी लेखतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांचा मानसिक व आर्थिक छळ करतात. या नालयकांना आज कळले असेल, "जात" ही शेण खाण्यासाठी असते, माणूस कर्माने, वागणुकीने आणि वृत्तीने श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत असतो. जर या बिनडोक पण वर्तन भ्रष्ट मंडळींना आजही हे "जाणव"त नसेल तर त्यांचा लल्ला त्यांना सुबुद्धी देवो.


या नव्या भारतात, नव्या राष्ट्रात काही संस्था उभ्या करायला, नावारूपाला आणायला संस्थापक-मालकांच्या 3-4 पिढ्या लागल्या, नव्या भारतातील काही संस्थांना 90-90 वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् वारसा लाभला आहे, तर काही संस्था नवरात्रीतील 9निर्मिती अशा नव्या आहेत  मात्र, भ्रष्ट अधिकारी व नालायक कर्मचारी एका रात्रीतून संस्थेची इभ्रत, अब्रू आणि 9 ते 90 वर्षांची परंपरा धुळीस मिळवतात, हे काल दिसून आले. माजावर आलेल्या काही मंडळींनी संस्थेची आणि चांगल्या मालक मंडळींची अक्षरश: लाज घालवली. 


वर ही दीड-दमडीची मंडळी मालक आपल्या खिशात आहे, आपण मालकाचे "खास" आहोत, मालकाचे आपल्याशिवाय पान हलत नाही, आपण त्यालाच "हर तऱ्हेने" रग्गड कमाई करून देतो, अशा गमजा मारतात, ही निर्लज्ज मंडळी. 9-नवीन इव्हेंट करणे आणि त्यातून कट मनी उकळणे, असा धंदा मांडला आहे या सिंडिकेट टोळक्याने. ते संजय राऊत काल "चोरमंडळ" म्हणाले, खरेतर नव्या भारतात आणि नव्या राष्ट्रात काही संस्थात हे "चोरमंडळ" आहेच आहे. हे सारे चोर एकमेकांना सामील आहेत, एकमेकांचे धंदे आणि चोऱ्या माहिती असल्याने ते मिळून-मिसळून राहतात. आपण सारे भाऊ-भाऊ, मिळेल ते वाटून खाऊ, अशी या चोर मंडळांची नव्या भारतात, नव्या राष्ट्रात मानसिकता आहे. काही हुजारे, लाचार, बाजार बुणगे, बिनाकण्याचे आणि मनुची पिलावळ असलेले पत्रकार या चोरमंडळाला सामील आहेत. त्यातील एक तर स्वतः इतरत्र संपादक असल्याचे सांगितले जाते. मात्र, घरची "वित्त" ची "बातमी" काही धड जमत नसल्याने हे महोदय इतरत्र कमिशन, सिंडीकेशन अन् दलालीचे धंदे करतात. ते तसे कालच्या तमाशात नव्हते. जे होते, त्याच्या मामांनाही शरमेने नक्कीच मान खाली घालावी लागली असेल. चांगल्या मामाचे हे असे कसे भाचे बुवा? 


क्लबात काल आचार, उच्चार अन् एच्चार (विचार, HR समजला का?) हरपून बसलेल्या मंडळीतील काहींना जोर-जबरदस्ती, धाक दाखवून, दबावाने नेण्यात आले. इतकेच काय, सर्व वरिष्ठांनी मिळून त्यांना सक्तीने, बळजबरीने दारू पिण्यास भाग पाडले. तसे केले नाही, तर मग कितीही पूजा - "अर्चना" वैगेरे केली तरी फायदा होणार नाही, अगदी, "वैष्णो" देवीला जरी जाऊन आले तरी फायदा होणार नाही, असे बजावण्यात आले. जर, दारू प्यायलात, कंपनी दिलीत, तर ललित मोदी यांची बायको, "मीनल" चे स्वित्झर्लंडमधील बँक खाते जसे फुल्ल असते, तसे वाढीव "पगार" देऊन तुमचे बँक खाते भरून देऊ, असे आमिष महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आले, त्यांना धमकी देण्यात आली. सर्व वरिष्ठ अधिकारी पेग वर पेग रिचवत होते, सगळे चांगलेच झिगले होते.  कुमार सानू स्टाईल गायकाला तर धड उभेही राहता येत नव्हते. झोकांड्या देत होता, तोल जात होता, सावरायलाही कुणी नव्हते, कारण सर्व फुकटची पिऊन तर्र झाले होते. महिलांनाही तोल सावरता येत नव्हता, इतकी सक्तीने दारू पाजली होती. अनेक जण ओकून घाण करत होते. क्लबचे स्वच्छतागृह, माध्यम केंद्र प्रवेश, टेरेसच्या पायऱ्या अन् फ्लोअर सर्वत्र उलट्या करून या डुकरांनी घाण करून ठेवली होती. त्यामुळे क्लबमध्ये आलेल्या इतर पत्रकारांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. निवृत्त होणाऱ्या व्यक्तिलाही लाज वाटावी, असा हा सारा तमाशा होता. त्याला तर स्वतःला आपण तिरंगा मूव्हीमधील दीपक "शिर्के याने साकारलेला व्हीलन गुंडास्वामी तर नाही ना, इतके अपराध्यासारखे वाटत असेल. 

महिलांना धड चालता येत नव्हते, त्यांचा तोल जात होता, अशी अवस्था होईस्तोवर त्यांना बळजबरी करून त्यांना दारू पाहणारी ही कुठली संस्कृती?


खरे तर क्लबच्या इतिहासातही प्रथमच इतका राडा  झाला. प्रेस क्लबच्याही नावाला कलंकित करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करायला हवे, अशी मागणी यामुळे होत आहे. माणसे फक्त पदाने "राजे" असून चालत नाही, त्यांचे वर्तनही तसे असावे लागते. नाहीतर, पत्रकारिता ही "चाटुकारिता" ठरते आणि मूळ पत्रकारितेचे काम सोडून भ्रष्ट व नालायक वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी "दारूकाम"ची व्यवस्था करणे, हीच जॉब प्रोफाईल बनून राहते. काल क्लबच्या काही जागरूक सदस्यांनी खडस वले म्हणून क्लबमध्ये सुरू असलेला फुकट्या, अट्टल बेवड्यांच्या झोपडपट्टीछाप गोंधळातून इतर सदस्यांसाठी उभा राहिलेला समर प्रसंग टळू शकला. क्लबची बेवड्या डुकरांपासून सुटका झाली. अर्थात, फुकटची मिळाली आहे म्हणून कोणतेही तारतम्य न बाळगता गळ्यापर्यंत येईस्तोवर ढोसणाऱ्या, हपापलेल्या मंडळींनी क्लबात सर्वत्र ओकून-ओकून घाण केलीच. स्वच्छतागृहात, माध्यम केंद्राबाहेर तसेच टेरेसच्या निम्म्या फ्लोअरवर घाण करून ठेवली होती. अली कडे पत्रकारितेत अशा जाहिल प्रवृत्ती बोकाळत चाललेल्या आहेत. त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे. क्लबनेही अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबरोबरच आपली गेस्ट पॉलिसी आणि पार्टी नियमावलीचेही अवलोकन करायला हवे. 


दुःख एका गोष्टीचे आहे, की एका गांधीवादी मालकाच्या संस्थेत हे असले माकडचाळे सुरू आहेत. मालकांच्या पुढल्या पिढीनेही "व्यवहार"पेक्षा "ब्रँड"चे पावित्र्य आणि नावलौकिक याचा विचार करून संस्थेत बोकाळलेल्या आणि माजलेल्या वर्तनभ्रष्ट बोक्यांच्या ढुंगणावर लाथ मारून साफसफाई करायला हवी. तर आणि तरच स्वर्गातील गांधीवादी आत्म्याला शांती मिळेल. संस्थेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे सिंडिकेट "चोरमंडळ" हाकलून लावले तर असे कलंकित करणारे प्रसंग भविष्यात उद्भवणार नाहीत. याशिवाय, काही गुळाचे गणपती काही नुसता तमाशा पाहण्यासाठी निवासाला ठेवलेले नाहीत, याचाही जाब विचारण्याची हिंमत दाखवायला हवी. 


काहींना निवृत्तीचे निरोप दिले असतील; पण आता संस्थेची लाज घालविणाऱ्यांना निवृत्त करण्याची वेळ आली आहे. महिलांना सक्ती करून, बळजबरीने दारू पाजणाऱ्या या अवलादी कुठल्या? धड चालताही येऊ नये, वारंवार तोल जावा, आधार द्यावा लागावा, इतकी महिलांची वाईट स्थिती करून सोडणाऱ्या हरामखोर प्रवृती माणूस आणि संस्था कितीही गांधीवादी असली तरी कशा सहन करायच्या? हे असले नालायक कर्मचारी नर्मदाकिनारी माहेश्र्वरी नेऊन विसर्जित करायला हवेत. महेश्वर तीर्थस्थानी राणी अहिल्याबाई यांच्या किल्ल्यावरून या नालायकांचा कडेलोट करायला हवा. केवळ पैसा आणि व्यवसाय हे संस्थेचे उद्दिष्ट असता कामा नये. बापाजाद्यांनी गांधीवादी वृत्तीने उभारलेला ब्रँड आहे म्हणून आज सर्व काही आहे. हा ब्रँड कलंकित करणाऱ्याला सहन करणे म्हणजे कमकुवतपणा ठरेल. हिंदू वराह पुराणात, "निमिष" मात्र  म्हणजेच पापणी लावण्याच्या आत, क्षणार्धात ईश्वराने दानवांचा नाश केला होता. ते निमिषारण्य आजही गोमतीकाठी आहे. नव्या भारतातील आणि नव्या राष्ट्रातील निमिषारण्य पवित्र ठेवायचे असतील तर आजही दानवी प्रवृत्तीच्या नालायकांचा हिशेब क्षणार्धात मोकळा करायला हवा. तरच पुन्हा 9-90 ची परंपरा अभिमानाने सांगता येईल. आज, स्वर्गातील गांधीवादी आत्मा नक्कीच अश्रू ढासळत असेल. हे ईश्वर, हे रामा, हे कृष्ण गोपाला, त्या मृतात्म्यास शांती दे!!


Post a Comment

0 Comments