बातमीदारी की गुलामी?


पूर्वी 'छापून आले म्हणजे खरेच असेल' हा विश्वास होता. कारण फक्त प्रिंट मीडिया होता. सकाळी "लोकसत्ता", "सकाळ" किंवा "तरुण भारत" हातात आला, की जणू ईश्वरवाणीच उतरली! उदाहरण द्यायचं झालं तर – १९७५ चं आणीबाणीचं वृत्त असो, की १९९३ मधलं मुंबई बॉम्बस्फोटाचं कव्हरेज – अक्षरं खरंच हुंकार भरायची!

पण मग टीव्ही आला… आणि 'ब्रेकिंग न्यूज'च्या नावाखाली ब्रेनवॉशिंग सुरू झाली.

कुत्रा रस्ता क्रॉस करतोय, "ब्रेकिंग न्यूज!"
फेसबुकवर सेलेब्रिटीने फोटो टाकला, "महत्वाचं!"
शरद पवार आजारी – "अरे बाबा, पुन्हा वाऱ्यावरची बातमी!"

चॅनलवर डिबेट्स सुरू झाले… चर्चेचं रूपांतर चिचिचर्चेत झालं. अँकर ऐकत नाहीत, आणि पाहणारे समजून घेत नाहीत. न्यूजपेक्षा नजरबंदी आणि 'नजराणे' जास्त गाजू लागले.

आता आला डिजिटल मीडिया – मोबाईलमध्ये येणाऱ्या 'कॉपी-पेस्ट' च्या पेढ्या.

इथे तर 'क्लिक करा आणि खोटं पका' असा काही फॉरम्युला चालतोय!
एकाच बातमीचं ३० हेडलाईन्स – पण कुठेही माहिती नाही, फक्त मते!
"MLA ने दिलं मोठं वक्तव्य" – पण MLA कोण? वक्तव्य काय? … "पुढे वाचा" म्हणत भोंगळ लिंक!

नावं घेऊन सांगायचं झालं तर अनेक ‘पेड पत्रकार’ आता व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीचे ‘प्राध्यापक’ झालेत!

पत्रकारितेचं आता ‘बातमीदारी’तून ‘वफादारी’त रूपांतर झालंय.


आता पत्रकार प्रश्न विचारत नाही – तो आदेश पाळतो.
'कंटेंट क्रिएटर' नावाने शिरलेले पेड ब्लॉगर ‘सत्य’च्या अंगावर फेक न्यूजचं व्हाइट वॉश करतायत!
तोंडाला मास्क, डोक्याला हेडफोन, आणि मेंदूला 'टीआरपी चा कॅन्सर' झालाय.

आज बातमी विकली जाते, सजवली जाते आणि कोणाच्या तरी हुकुमाने उगम पावते!

शेवटी प्रश्न हाच – आपण बातम्या शोधतोय की 'बाप' शोधतोय?
कारण सध्याच्या माध्यमांत “कुत्रा चावला” हे नाही,
“कुत्रा कोणाला चावायचं ठरवलं” हे आधी ठरवलं जातं!


#बेरक्याची टीप:
बातमीदार पूर्वी सत्यावर गोंधळ घालायचा,
आता ‘सत्यावर’ बातमी घालतो!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या