महाराष्ट्रातली पत्रकारिता सध्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने चाललीये... पण तिचा ब्रेक कुठे लागेल हे कोणालाच माहीत नाही. ताजं उदाहरण म्हणजे एक आघाडीच्या चॅनलच्या पुण्यातील ब्युरोचा "पाकीटप्रसाद" प्रकार!
तर झालं असं – चॅनलचे सर्वेसर्वा संपादक पुण्याला आले होते. ब्युरोवाल्यांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रेमाने मिठाई दिली... आणि सोबत एक ‘गिफ्ट पाकीट’ सुद्धा. संपादक खुश झाले… पण जेव्हा पाकीट उघडलं, तेव्हा त्यात साखरचं नव्हे तर 'संपादक शॉक'! कारण त्यात होते एक लाख रुपये रोख!
संपादक बिचारे थेट साधुपंथी – त्यांनी आयुष्यात कधी 'रोख सन्मान' घेतलाच नव्हता. हे बघून त्यांना असा राग आला की त्यांनी थेट मालकांना फोन करून सांगितलं – "बघा बघा, पुण्याचं ब्युरो पाकीटं वाटतोय!" मालकानेही HR ला फोन लावला आणि दुसऱ्या दिवशी ब्युरोवाल्याला "नारळ" दिला. म्हणजे चॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवला.
हे प्रकरण पहिलं नव्हतं. दोन वर्षांपूर्वी याच ब्युरोने एका बिल्डरकडून ‘EMI’ ( दरमहा वीस हजार) घेण्याचा पराक्रम केला होता. तसेच कार घेण्यासाठी दोन लाख देखील , सगळे पुरावे होते, पण जुनं प्रकरण म्हणून तेव्हा मॅनेजमेंटने "जाऊ द्या, पहिलं चुकलं…" म्हणून सोडून दिलं. यावेळी मात्र "फिर से गलती? नारळ घ्या भाऊ!"
📣 'इतर रिपोर्टर संपादकांना पाकीट देतात म्हणून आपणही दिलं, पण तेच पाकीट अंगाशी आलं!'
— हेच या कथेचं 'पकिटतत्वज्ञान' आहे!
🌀 बेरक्या म्हणतो:
"पत्रकारितेचं पाकीटीकरण सुरू झालंय राव… पण लक्षात ठेवा, काही संपादक अजूनही पाकीट उघडून फाईल लावणारे आहेत, फाईल खाल्ली की नोकरी जाते, पाकीट नाही!"
🗞️ 'जाता जाता - जिथे पत्रकारितेच्या नावाखाली पाकीटं फिरतात, तिथेच आमचा ब्लॉग बिनधास्त फिरतो!'
0 टिप्पण्या